एक गाणं...
पावसामध्ये
सूर हरवून भिजलं...
बेसुऱ्या बेडकाच्या...
घशात जाऊन थिजलं...!
एक पाऊस...
रस्त्यावरती...
थेंब हरवून बसला...
अळवाच्या पानावर....
क्षणभरच दिसला....!
एक तो...
तिच्या हसण्यावर...
खुळ्यागत फसला...
ताळ्यावर येण्यासाठी ...
पावसात भिजत बसला...!
This blog dedicated to my friends and family. Here I am trying to provide information about MPSC, Maharashtra public Service commission, UPSC, Education, Government jobs, Bank Jobs etc. The common entrance test is compulsory now a days to take admission hence you will get latest information about GPAT, Graduate Pharmacy aptitude test, GPAT syllabus, CAT, MH-CET here. Wish you all the best for bright future.
Showing posts with label marathi gani. Show all posts
Showing posts with label marathi gani. Show all posts
Saturday, July 9, 2011
Thursday, July 8, 2010
बोलायच खुप असत मला Marathi Poem
बोलायच खुप असत मला Marathi Poem
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.......
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.....
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही............
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही...........
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही........
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही............
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत
कळत नाही कधी कधी,
कळत नाही कधी कधी,
हे असे का होते?
मन कोणासाठी तरी,
एवढे वेडे का होते?
ज्याच्यासाठी हे वेडे होते,
त्याला ते माहितीही नसते,
मग आपल्याच मनाला,
हे असे का होते?
कधी स्वपनांच्या दुनियेत हरवते,
कधी जगाला ही विसरते,
कधी मोहाच्या चार क्षणांसाठी,
हे क्षण क्षण झुरते.
माहिती नाही अजुन हे,
असं किती दिवस चालणार?
स्वपनांच्या दुनियेतून अखेर हे,
माझं मन कधी बाहेर पडणार?
Monday, July 5, 2010
कधी कधी मनात, बरच काही असुनही - Marathi poem
Marathi poem - कधी कधी मनात, बरच काही असुनही
कधी कधी मनात, बरच काही असुनही,
सत्यात ते कधीच येत नसतं,
अन कधी कधी, मनात काही नसतानाही,
बरच काही घडत असतं !!
पण, प्रत्येकवेळी मन बिचारं त्याचं,
फ़क्त तिच्यासाठीच झुरत असतं..
मनात त्याच्या असुनही,
तो तिला साद देत नाही,
अन त्याने, साद दिलीच नाही,
म्हणुन तीही प्रतिसाद देत नाही,..
साद-प्रतिसादाच्या खेळातुन या,
कुणालाच काही मिळत नसतं,
पण, दोघांमधल प्रेम मात्र,
एकटच बिचारं रडत असतं .!!..
स्वप्नं पहाटेची म्हणे, सर्वांचीच
खरी होत असतात,
मग 'आपलीच' स्वप्नं अशी
धुळ खात का पडतात ?
पहाटेच सोडाच, रात्रं-दिन क्षणभरही,
डोळ्याआड तिचं, जाणं नसतं,
म्हणुनच कदाचीत, डोळ्यांतल्या आसवांच,
मनाच्या उताराकडेच, धावणं असतं,
अन, बिचाय्रा मनाच्या नशीबी,
एकटक सगळं पहाणं असतं...
कधी कधी मनात, बरच काही असुनही,
सत्यात ते कधीच येत नसतं,
अन कधी कधी, मनात काही नसतानाही,
बरच काही घडत असत
Subscribe to:
Posts (Atom)