Thursday, July 8, 2010

बोलायच खुप असत मला Marathi Poem

बोलायच खुप असत मला Marathi Poem


बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.......
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.....

खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही............
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही...........
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही........

चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही............
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत

कळत नाही कधी कधी,
कळत नाही कधी कधी,
हे असे का होते?
मन कोणासाठी तरी,
एवढे वेडे का होते?

ज्याच्यासाठी हे वेडे होते,
त्याला ते माहितीही नसते,
मग आपल्याच मनाला,
हे असे का होते?

कधी स्वपनांच्या दुनियेत हरवते,
कधी जगाला ही विसरते,
कधी मोहाच्या चार क्षणांसाठी,
हे क्षण क्षण झुरते.

माहिती नाही अजुन हे,
असं किती दिवस चालणार?
स्वपनांच्या दुनियेतून अखेर हे,
माझं मन कधी बाहेर पडणार?